अकलूज उद्या दुपारी २ वाजेपर्यंत बंद; उषा साठे हत्येच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाचा निर्णय


 अकलूज उद्या दुपारी २ वाजेपर्यंत बंद; उषा साठे हत्येच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाचा निर्णय

अकलूज | प्रतिनिधी: गणेश इंगळे.

चौंडेश्वरवाडी येथील उषा साठे या मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध म्हणून बुधवार, १५ जुलै रोजी सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत अकलूज शहर बंद ठेवण्याचा निर्णय सकल मातंग समाजाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तो शांततेत व स्वयंस्फूर्तीने पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बंद काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत.

उषा साठे यांच्या हत्येनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने अकलूज शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाची भावना व्यक्त होत असून, न्याय मिळावा यासाठी विविध स्तरांतून आवाज उठवला जात आहे.

(टीप : हा बंद सकल मातंग समाजाच्या आवाहनानुसार असून, नागरिकांनी शांतता व कायदा-सुव्यवस्था राखत सहकार्य करावे.)


49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!