अकलूजच्या १५ तरुणांची अविस्मरणीय उत्तराखंड चारधाम यात्रा; अवघ्या ₹२० हजारांच्या पॅकेजमध्ये अनुभवली देवभूमीची दिव्यता आणि हिमालयाचे नयनरम्य सौंदर्या


अकलूजच्या १५ तरुणांची अविस्मरणीय उत्तराखंड चारधाम यात्रा; अवघ्या ₹२० हजारांच्या पॅकेजमध्ये अनुभवली देवभूमीची दिव्यता आणि हिमालयाचे नयनरम्य सौंदर्य

अकलूज | संपादकीय

“उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात, हे तिथे गेल्याशिवाय समजत नाही,” असे अनेकदा ऐकले होते. मात्र कोल्हापूर येथील गंतव्य टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा श्री. कृष्णा भोसले यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अकलूजच्या १५ तरुणांना उत्तराखंडची चारधाम यात्रा आणि अनेक ऐतिहासिक, धार्मिक तसेच निसर्गरम्य स्थळांचा अविस्मरणीय अनुभव घेण्याची संधी मिळाली.

विशेष म्हणजे केवळ ₹२०,००० च्या किफायतशीर पॅकेजमध्ये राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा-नाश्ता, जेवण, संपूर्ण प्रवासासाठी वाहन व्यवस्था यासह सर्व सुविधांचा समावेश होता. आज अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स चारधाम यात्रेची विविध पॅकेजेस देतात; मात्र अत्यंत कमी खर्चात उत्तम नियोजन, सुरक्षित प्रवास आणि समाधानकारक सेवा देत गंतव्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कोल्हापूर यांनी ही यात्रा संस्मरणीय करून दाखवली.

१० दिवसांचा आध्यात्मिक आणि निसर्गरम्य प्रवास

दिवस १ – २५ जून

हरिद्वार – मसुरी – केम्टी फॉल्स – बारकोट (मुक्काम)

हरिद्वारच्या पवित्र गंगाघाटांपासून प्रवासाची सुरुवात झाली. मसुरीच्या डोंगररांगांमधील थंडगार वातावरण आणि केम्टी फॉल्सचा मनमोहक धबधबा पाहून प्रवासाची सुरुवातच अविस्मरणीय झाली.

0-9216×5184-0-0-{}-0-12#

दिवस २ – २६ जून

बारकोट – जानकीचट्टी – यमुनोत्री दर्शन – बारकोट

चारधाम यात्रेतील पहिले धाम असलेल्या यमुनोत्री येथे माता यमुनेचे दर्शन घेत आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.

दिवस ३ – २७ जून

शिवगुफा – उत्तरकाशी – काशी विश्वनाथ मंदिर

भगवान शिवाशी संबंधित शिवगुफा आणि उत्तरकाशी येथील प्राचीन काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेऊन दिव्य अनुभूती मिळाली.

दिवस ४ – २८ जून

हर्षिल व्हॅली – गंगानी – गंगोत्री – उत्तरकाशी

हर्षिल व्हॅलीचे हिरवेगार सौंदर्य, गंगानीचे गरम पाण्याचे कुंड आणि गंगोत्री धामातील पवित्र वातावरण मनाला स्पर्शून गेले.

दिवस ५ – २९ जून

रुद्रप्रयाग – गुप्तकाशी – गुप्त महादेव – शेरसी

रुद्रप्रयागचा संगम, गुप्तकाशीचे धार्मिक महत्त्व आणि गुप्त महादेव मंदिराचे दर्शन घेत पुढील प्रवास सुरू राहिला.

दिवस ६ – ३० जून

सोनप्रयाग – गौरीकुंड – केदारनाथ ट्रेक – केदारनाथ मुक्काम

हिमालयाच्या कुशीतून सुरू झालेला केदारनाथ ट्रेक हा संपूर्ण यात्रेतील सर्वात रोमांचक आणि भक्तिमय अनुभव ठरला.

दिवस ७ – १ जुलै

केदारनाथ दर्शन – भैरवनाथ दर्शन – गुप्तकाशी/शेरसी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथाचे दर्शन आणि भैरवनाथ मंदिरातील आध्यात्मिक वातावरण मनाला ऊर्जा देणारे ठरले.

दिवस ८ – २ जुलै

उखीमठ – चोपता – तुंगनाथ – चंद्रशिला – जोशीमठ

“मिनी स्वित्झर्लंड” म्हणून प्रसिद्ध असलेल्या चोपताचे निसर्गसौंदर्य, जगातील सर्वात उंच शिवमंदिर तुंगनाथ आणि चंद्रशिलावरून दिसणारे हिमालयाचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवण्यासारखे होते.

दिवस ९ – ३ जुलै

बद्रीनाथ दर्शन – माना गाव – जोशीमठ

भगवान बद्रीविशालांचे दर्शन घेत भारतातील शेवटचे गाव माना, व्यास गुंफा, गणेश गुंफा आणि सरस्वती नदीचे दर्शन घेतले.

दिवस १० – ४ जुलै

विष्णुप्रयाग – नंदप्रयाग – कर्णप्रयाग – रुद्रप्रयाग – देवप्रयाग – ऋषिकेश – हरिद्वार

पंचप्रयागांचे दर्शन, लक्ष्मण झुला, राम झुला आणि हर की पौडीवरील भव्य गंगा आरतीने संपूर्ण यात्रेची सांगता झाली.

निसर्गाचे अप्रतिम रूप

या यात्रेदरम्यान हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत, हिरव्यागार दऱ्या, वेगाने वाहणाऱ्या नद्या, धबधबे, ढगांनी वेढलेली शिखरे आणि प्रत्येक मंदिरातील दिव्य वातावरण पाहून  प्रत्येकजण भारावून गेला. प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवीन रूप पाहायला मिळत होते. “एक वेळ पाहणारा कंटाळेल, पण दाखवणारा कंटाळणार नाही,” अशीच भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात निर्माण झाली.

यात्रेबाबत सुधीर पवार म्हणाले,

“चारधाम यात्रा करणे हे माझे अनेक वर्षांचे स्वप्न होते आणि महादेवाच्या कृपेने ते पूर्ण झाले. या यात्रेने मला श्रद्धा, संयम, सहकार्य आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची नवी प्रेरणा दिली. केदारनाथचा ट्रेक, बद्रीनाथ धाम, माना गाव, तुंगनाथ, चंद्रशिला आणि संपूर्ण हिमालयाचे दर्शन आयुष्यभर स्मरणात राहील. 

सहप्रवाशांच्या भावना

अनिल रेवंडे म्हणाले,

“उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात, हे तिथे गेल्याशिवाय समजत नाही.”

अक्षय भरगंडे म्हणाले,

“हा प्रवास फक्त ठिकाणांचा नव्हता, तर मनाला समृद्ध करणारा अनुभव होता. आठवणींची शिदोरी घेऊन परतलो; पण मनाचा एक तुकडा तिथेच राहून गेला.”

अमित कुर्डे म्हणाले,

“ही चारधाम यात्रा सुखाची, समाधानाची, आनंदाची आणि एक वेगळी ऊर्जा देणारी ठरली.”

राहुल माने म्हणाले,

“उत्तम नियोजन आणि सुरळीत दर्शनामुळे कमी वेळात जास्तीत जास्त उत्तराखंड अनुभवता आले. याचे सर्व श्रेय कृष्णा भोसले यांच्या नियोजनाला जाते.”

या अविस्मरणीय यात्रेत सहभागी झालेले अकलूजचे तरुण 

  1. श्री. वैभव टोंगळे
  2. श्री. राहुल माने
  3. श्री. अनिल रेवंडे
  4. श्री. सुधीर पवार
  5. श्री. सूरज सूर्यवंशी
  6. श्री. सिद्धेश्वर सूर्यवंशी
  7. श्री. अतुल क्षीरसागर 
  8. श्री. मनोज विभुते
  9. श्री. अमित कुर्डे
  10. श्री. समाधान टिपरे
  11. श्री. अक्षय भरगंडे
  12. श्री. शुभम जठार
  13. श्री. अभिजीत पिसे
  14. श्री. अजिंक्य गाडे
  15. श्री. मयूर पिसे
  16. कु. श्रेया माने

या सर्वांनी भक्तिभाव, उत्साह आणि एकोप्याने ही यात्रा पूर्ण केली. प्रवासादरम्यान एकमेकांना दिलेली साथ, आलेल्या अडचणींवर मात करत केलेला प्रवास आणि सोबत घालवलेले क्षण आयुष्यभर स्मरणात राहतील.

उत्कृष्ट नियोजनामुळे यात्रा ठरली संस्मरणीय

या संपूर्ण यात्रेचे नियोजन करणारे गंतव्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कोल्हापूरचे सर्वेसर्वा श्री. कृष्णा भोसले यांनी प्रत्येक मुक्काम, वेळेचे व्यवस्थापन, सुरक्षित प्रवास, उत्तम निवास व्यवस्था, स्वादिष्ट भोजन आणि  वैभव टोंगळे यांनी  सर्वांची घेतलेली काळजी यामुळे ही यात्रा अत्यंत सुखकर व अविस्मरणीय ठरली. कमी बजेटमध्ये इतक्या उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी सर्व प्रवाशांचा विश्वास संपादन केला.

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा कराच…

चारधाम यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून आत्मिक समाधान, हिमालयाचे अद्भुत निसर्गसौंदर्य, भारतीय संस्कृतीचा साक्षात्कार आणि जीवनाला नवी दिशा देणारा अनुभव आहे. ज्यांना कमी बजेटमध्ये उत्तम नियोजनासह चारधाम यात्रा करायची आहे, त्यांच्यासाठी गंतव्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कोल्हापूर हा निश्चितच विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.

आयुष्यात एकदा तरी चारधाम यात्रा कराच…

“एक वेळ पाहणारा कंटाळेल… पण दाखवणारा कंटाळणार नाही…!”

हर हर महादेव! जय केदारनाथ! जय बद्री विशाल!

जय तुंगनाथ! 

 


49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!