अकलूज शहर बंद ठेवू नये; शांतता व समन्वय समितीचा सर्वानुमते निर्णय


ब्रेकिंग न्यूज | अकलूज शहर बंद ठेवू नये; शांतता व समन्वय समितीचा सर्वानुमते निर्णय

अकलूज | प्रतिनिधी

चौंडेश्वरवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत स्वर्गीय उषाताई साठे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शांतता व समन्वय समिती, अकलूज यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या अमानुष घटनेचा निषेध करत दोषींवर निःपक्षपाती व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.
दरम्यान, समितीच्या सोमवार (दि. १३ जुलै २०२६) रोजी झालेल्या बैठकीत अकलूज शहर बंद ठेवू नये, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत राहावे, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
शहर बंदबाबत विविध माध्यमांतून संदेश आणि चर्चा सुरू असल्या तरी नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीच्या आधारेच वर्तन करावे, असे आवाहनही समितीने केले आहे.
यावेळी अकलूजची शांतता, सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी सर्वांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा हीच सर्वांची भावना असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समितीने नमूद केले आहे.
शांतता व समन्वय समिती, अकलूज

49
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!