हरवलेले मोबाईल परत मिळाले; अकलूज पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
अकलूज प्रतिनिधी:
चोरीस गेलेले, गहाळ झालेले मोबाईल हॅण्डसेंटचा मोबाईल नंबर, आय.एम.ई.आय. नंबर सी.ई.आय.आर. या भारत सरकार पोर्टल च्या माध्यमातुन मोबाईलचा आय.एम.ई.आय. नंबर ब्लॉक करुन त्याव्दारे प्राप्त माहितीच्या अधारे सदर मोबाईल वापर कर्त्याची माहिती प्राप्त करुन त्यांचे तांत्रिक विश्लेषण करुन सदरचे मोबाईल महाराष्ट्र तसेच परराज्यातुन कसोशीने व कोशल्यपुर्ण तपास करुन जानेवारी २०२६ पासून आजअखेर ५० मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

दिनांक ०७/०४/२०२६ रोजी सदर मोबाईलचे मुळ मालक यांना मोबाईल त्यांचे ताब्यात देण्यात आले आहेत. सदरचे मोबाईल त्यांना परत मिळाल्याने त्यांचे चेह-यावर आनंद व्दिगुणीत होवून सर्वांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभार मानले. तसेच यापुर्वीही ७५ मोबाईल हॅण्डसेट मुळ मोबाईल मालक यांना परत देण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तुळशिराम गायकवाड यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
सदर कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधिर टेंगले, महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वणवे, पोलीस अंमलदार तुळशिराम गायकवाड, बबलू गाडे, तानाजी टिंगरे, राहुल रणनवरे व फिर्यादी लोक हजर होते.






