अकलूजमध्ये २ अनधिकृत कत्तलखाने व ५ शेड्सवर कारवाईची मागणी;शिवशंकर स्वामींचे प्रशासनाला निवेदन
१७ गुन्हे दाखल असूनही बेकायदेशीर कत्तल सुरूच; प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन

अकलूज प्रतिनिधी;
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देखील दिलेला आहे. तरी देखील अकलूज शहरामध्ये दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये गोवंशाची कत्तल चालू आहे.
अकलूज नगरपरिषद च्या हद्दीमध्ये कसाई मोहल्ला / खाटीक गल्ली , मसूद मोहल्ला , समतानगर , लकी खानावळच्या बाजूच्या बोळात या परिसरात एकूण ७ अनधिकृत व बेकायदेशीर कत्तलखाने व कत्तलीसाठी जनावरांना बांधण्यासाठी शेड्स आहेत. सदर ठिकाणी पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा छापे टाकून कायदेशीर कारवाई केलेली आहे.
याबाबत अकलूज शहर पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ आणि पशुक्रूरता अधिनियम १९६० या कायद्याअन्वये १७ हून अधिक गुन्हे या कत्तलखान्यांवर / पत्र्याचे शेड्सवर तसेच गोवंश कापणाऱ्या गोमाफियांवर नोंद केलेले आहेत.
या कत्तलखान्यामध्ये अनिर्बिन्दपणे शेकडोंच्या संख्येत गोवंशाची कत्तल करुन गोमांस मुंबई , पुणे , सोलापूर , कर्नाटक या ठिकाणी आलिशान कार व टेम्पो मधून मोठ्याप्रमाणात पाठविण्याचे काम चालू आहे. तसेच अनधिकृत काही शेड्समध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाचासाठा तयार केला जातो आणि तो गोवंश बाहेर कत्तलीसाठी पाठवला जातो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कत्तलखान्याकडे नगरपरिषद जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून त्यांच्या वाढत्या तक्रारी येत आहे. आणि पर्यावरणाची सुद्धा हानी होत आहे. सामाजिक गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढलेले आहे.
अनेक वेळा अनधिकृत कत्तलखान्यांवर व पत्र्याच्या शेडसवर कायदेशीर कारवाई करून देखील प्रशासनाच्या नाकावर टिचून गोमाफियांचा मोरक्या हसन सौदागर , शहानवाज कुरेशी , बल्ल्या उर्फ निहाल कुरेशी , नजीर सौदागर , सद्दाम कुरेशी , अलीम कुरेशी व इतर १० ते १२ साथीदार हे कायदा पायदळी तुडवत प्रशासनाला खुले आवाहन देत आहेत का ? असा प्रश्न समस्त अकलूजकरांना पडत आहे.
खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
सर्व बेकायदेशीर कत्तलखाने व जनावरे बांधण्यासाठी तयार केलेले शेड्स तातडीने उध्वस्त करण्यात यावेत यासाठी मा. मुख्याधिकारी साहेब , मा. उप नगराध्यक्ष साहेब , मा. तहसीलदार साहेब , मा. प्रांत साहेब , मा. अकलूज शहर पो स्टे यांना सविस्तर तक्रार दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली लवकरच कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन प्रशासनाने दिले.
यावेळी गोरक्षक स्वप्नील भैय्या वाघमारे , स्वप्नील माने देशमुख ,प्रतीक भेगडे , शरद कोतकर , अवधूत घाटे व तसेंच 20 ते 25 गोरक्षक ,गोप्रेमी उपस्थित होते.







