(अकलूज प्रतिनिधी) दिवाळीत दुर्ग किंवा किल्ले बांधणे ही महाराष्ट्राची एक खास परंपरा आहे. ही केवळ मुलांसाठी एक मजेदार क्रिया नाही तर आपला इतिहास आणि संस्कृती लक्षात ठेवण्याचा एक सुंदर मार्ग देखील आहे.
याच संस्कृतीचा दर्शन आपल्याही मुलांना व्हावं आपलेही मुलांमध्ये शिवछत्रपतींची शंभू छत्रपतींची ऊर्जा समाविष्ट व्हावी म्हणून अकलूजचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सागर व्यवहारे हे लहानपणापासून ची दिवाळीमध्ये किल्ले बनविण्याची आवड अविरतपणे आजही जोपासात आहेत.
त्यांची मुलगी ऋग्वेदा व भाचा रुद्र,व भाची रिद्धी यांच्या समवेत त्यांनी यावर्षी जलदुर्ग प्रकारात मोडणारा पद्मदुर्ग हा किल्ला अगदी हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.व हा पद्मदुर्ग पाहण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी संग्रामनगर रत्नपुरी 20 मध्ये अनेकांची गर्दी होत आहे.

दिवाळीमध्ये किल्ला बांधून काय शिकावे?
दिवाळीच्या सुट्टीत, मुले माती, दगड आणि दगडांचा वापर करून छोटे किल्ले बांधतात. ते त्यांना खेळण्यातील सैनिक, राजे आणि झाडांनी सजवतात. या सर्जनशील कृतीमुळे त्यांना उत्सवाचा आनंद घेताना टीमवर्क, इतिहास आणि कला शिकण्यास मदत होते.

दिवाळीत किल्ले बांधायची पद्धत कोणी सुरू केली?
ही प्रथा महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांपासून च प्रेरित आहे, ज्यांनी अनेक किल्ले बांधले जे शौर्य, शक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक बनले आहे.

दिवाळीत किल्ला का बांधतात?
याविषयी मात्र काही संदर्भ सापडत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र यांनी अन्यायावर विजय मिळविला आणि सुराज्य आणले त्याप्रमानेच छत्रपती शिवरायांनी जुलमी सत्ताना उघड उघड आवाहन देऊन त्यांना नेस्तनाबूत केले. त्यासोबत हिंदवी स्वराज्य म्हणजे न्यायाचे राज्य आणले. महाराज या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. महाराजांना या कार्यात निसर्गाने देखील साथ दिली.महाराजांच्या पाठीमागे सागर, सह्याद्री आणि मावळे खंबीरपणे उभे होते. त्यांच्या प्रति आदरांजली म्हणून हे किल्ले बांधले जातात.

दिवाळीत किल्ले बांधल्याने लहानमुलांमध्ये शौर्य, सर्जनशीलता आणि परंपरा जिवंत राहतात. हे नवीन पिढीला आपल्या अभिमानास्पद वारशा शी जोडते आणि हा सण आणखी अर्थपूर्ण बनवते.म्हणून शिवछत्रपती यांचा आदर्श घेऊन दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा अखंडपणे चालूठेवण्याचं काम धारकरी सागर व्यवहारे यांनी केले आहे.व तसेच महाराष्ट्र शासनाच्या चला दुर्ग बनवूया या पोर्टल वरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे.

धैर्याचा दिवा लावा, स्वप्नांचा किल्ला बांधा आणि आपल्या वीरांचा वारसा साजरा करा.”







