*मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत बागेचीवाडी ग्रामपंचायत चा सहभाग*


*मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत बागेचीवाडी ग्रामपंचायत चा सहभाग*

माळशिरस  प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये गावाच्या विकासाच्या योजना राबवण्यात प्रेरणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना सुरू केली आहे.

बागेचीवाडी ग्रामपंचायत बागेचीवाडीने या योजनेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.या योजने अंतर्गत बागेचीवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक व सर्व सदस्य यांच्यावतीने गावात बरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मॅरेथॉन वार्ड सभा व आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

  1. वार्ड क्रमांक एक मध्ये मंगळवार दिनांक:- 16/ 12 /25 रोजी, हंसराज नगर येथे.
  2. बुधवार दिनांक:- 17/ 12/ 2025 रोजी, वार्ड क्रमांक दोन नवचारी अंगणवाडी येथे.
  3. गुरुवार दिनांक:- 18 /12 /2025 रोजी अंगणवाडी वितराग नगर येथे.
  4. सोमवार दिनांक 22/12/ 2025 रोजी वार्ड क्रमांक चार या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
  5. बागेची वाडी गावठाण येथील मारुती मंदिर येथे भव्य वार्ड सभा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रबोधन कार्यक्रम व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.२३/१२/२०२५ रोजी जि. प .शाळा बागेचीवाडी या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा महा मेळावा आयोजित केला आहे.
  6. त्याचबरोबर भारूडातून जनजागृती करण्यासाठी भारूडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामस्थांना चालू कर रक्कम 100% भरल्यास थकबाकी करात 50 टक्के सूट देण्याची योजना प्रभावीपणे सुरू असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा व मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना यशस्वी करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

या कार्यक्रमा वेळी बागेवाडी गावचे सरपंच कृष्णराज भैय्या माने पाटील यांच्यासह उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आरोग्य विभाग विभागाचे कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने योजनेअंतर्गत बालोद्यान करण्याचा निर्णय घेतला आहे :-

  • शासकीय कार्यालयाचे सुशोभीकरण करणे.
  • स्मशानभूमी मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देणे.

प्लास्टिक वर 100% बंदी आणण्यासाठी बागेची वाडी गावचे सरपंच यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व हॉटेल धारकांना प्लास्टिकचे ग्लास न वापरण्याची विनंती करून त्यांच्यासाठी मोफत काचेचे ग्लास वाटप केले आहेत.

गावातील प्रत्येक वार्डात स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते घरोघरी जाऊन या योजनेचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यावर भर देण्यात आला आहे याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना अंतर्गत बागेचेवडी गावात अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगण्यात आले.


45
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!