स्वराज्यहेर अकलूज प्रतिनिधी :
दिनांक :- २२ डिसेंबर २०२५. वार : सोमवार,आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी अकलूज ग्रामपंचायत जिच अकलूज नगर परिषदेमध्ये रूपांतरण होऊन निवडणूक झाली आणी निकाल ही लागला.
अकलूज शहराला पहिला नगराध्यक्ष व तसेच 26 नगरसेवक मिळाले.यामध्ये भाजपा चे 4 नगरसेवक सोडले तर संपूर्ण सत्ता मोहिते पाटील गटाची लागली असून मोहिते पाटील यांनी आपला गड राखला आहे.अकलूज नगर परिषदेची निवडणूक विरोधकांकडून पूर्णपणे प्रतिष्ठेची करण्यात आली होती.सगळीकडे भाजपमय वातावरण आहे, अशी चर्चा सर्व अकलूज शहरांमध्ये जनसामान्यांमध्ये होत होती.आणि याच प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये प्रभाग क्रमांक-१ राऊतनगर च्या निकाला कडे सर्वच अकलूज करांच्या नजरा लागल्या होत्या.
अ.प+श.प+भाजप अशी तिरंगी लढत या राऊत नगर मध्ये झाली.
या प्रभाग १ ‘ब’ च्या निवडणुकीमध्ये अ.प आणि भाजपकडून मोठ्या ताकदीचे उमेदवार उतरवण्यात आले होते.
नवे नवे तर हे दोन्ही उमेदवार माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याकारणाने श.प गटाच्या उमेदवाराचा टिकाव लागणार नाही अशी सर्वत्र चर्चा होती..परंतु श.प गटाकडून सर्वसामान्य कुटुंबातील जनतेशी नाळ असणारे, मोहिते पाटील कुटुंबाची एकनिष्ठ असलेले धनाजी भोसले यांच्या पत्नी सौ.वैशाली भोसले यांना या ठिकाणाहून संधी देण्यात आली.आणि नकारात्मक चाललेली चर्चा मोडीत काढून सकारात्मक ऊर्जा तयार करून तब्बल 33 मतांनी आपला विजय त्यांनी खेचून आणला.याच प्रभागांमध्ये विरोधकांकडून सर्वसामान्य जनतेला पैशाची प्रलोभने दाखवण्यात आली होती.परंतु याला बळी न पडता एका सर्वसामान्य घरातील कर्तबगार महिलेला त्यांनी या ठिकाणाहून निवडून दिले म्हणून,हा माझा विजय नसून हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती चा विजय आहे. असही त्यांनी आवर्जून सांगितलं.
जनतेच मोहिते पाटील कुटुंबावरती असलेलं प्रेम,आदरणीय मोठे दादा यांचे मिळालेले आशीर्वाद,खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी दाखवलेला विश्वास,माझे पती श्री.धनाजी भोसले यांचा असलेला जनसंपर्क, मित्रपरिवार,त्यांनी अहोरात्र केलेली मेहनत पूर्णपणे कामी आली आणि जनतेने दिलेला आशीर्वाद हा पूर्णपणे सार्थ ठरला म्हणूनच आज या राऊतनगरच्या जनतेने बलाढ्य शक्तिला नाकारून एका सर्वसामान्य घरातील महिलेवरती विश्वास टाकून मला या अकलूज नगर परिषदेच्या नगरसेवकपदी आपली सेवा करण्यासाठी विराजमान केलं त्याबद्दल अकलूज शहरातील जनतेचे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे,व तसेच मोहिते पाटील परिवाराचे मी मनापासून आभार मानते.
ही निवड म्हणजे विकास, सामाजिक सलोखा आणि लोकाभिमुख राजकारणाच्या विचारांना मिळालेली भक्कम पावती आहे.मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे.असंही त्यांनी या ठिकाणी स्वराज्यहेर शी बोलताना सांगितलं.मोहिते पाटील परिवाराचा विश्वास आणि जनतेचा विकास हेच आमचे पुढचं ध्येय असणार आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे श्री.धनाजी भोसले. यांनी सांगितले.







