अकलूज परिसरात उष्णतेचा इशारा: 45°C ते 55°C तापमानाचा अंदाज, प्रशासनाची नागरिकांना सावधगिरीची सूचना


अकलूज परिसरात उष्णतेचा इशारा: 45°C ते 55°C तापमानाचा अंदाज, प्रशासनाची नागरिकांना सावधगिरीची सूचना

अकलूजसह राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस प्रचंड उष्णतेची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 29 एप्रिल ते 12 मे या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत तापमान 45°C ते 55°C पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिक संरक्षण महासंचालनालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, या कालावधीत अत्यंत उष्ण आणि कोरडे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

⚠️ आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना:

  • घरातील दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवा
  • पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करा
  • मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा, कारण ओव्हरहिट होण्याचा धोका
  • ताक, लिंबूपाणी, दही यांसारखे थंड पदार्थ आहारात घ्या
  • उन्हात बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण (टोपी/कापड) वापरा

🚗 वाहनधारकांसाठी सूचना:

  • गॅस सिलिंडर, लायटर, ज्वलनशील वस्तू वाहनात ठेवू नयेत
  • वाहन पूर्णपणे लॉक करून ठेवू नये, थोडी हवा खेळती राहू द्या
  • टायर प्रेशर तपासा, जास्त हवा भरू नका
  • शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच प्रवास करा

🐍 वन्यजीव व सर्पदंशाचा धोका:

उष्णतेमुळे साप आणि विंचू बाहेर पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आजूबाजूची स्वच्छता राखावी आणि सतर्क राहावे.

🏠 घरगुती उपाय:

  • घरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पडदे, कूलर किंवा पंख्याचा वापर करा
  • दर 2-3 तासांनी विश्रांती घ्या
  • लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या
  • प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सजग राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

👉 “कृपया सावध रहा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा,” असे आवाहनही करण्यात आले आहे.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 

         स्वराज्य हेर न्यूज 

 


45
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!