माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड:
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना अंतर्गत बागेची वाडी येथे विविध कार्यक्रम व समाज प्रबोधन जनजागृती व महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत बागेचीवाडी गावाने जगप्रसिद्ध भारुडकार राजगुरू महाराज कनेरी या भारूडाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमांमध्ये समाजप्रबोधनाबरोबर प्लास्टिक बंदी, युज अँड थ्रो प्लॅस्टिक वापर बंद करणे याबाबत जनजागृती करण्यात आले.तसेच महिला बचत गट यांचे उपस्थितीत महिला मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यात उपस्थित महिलांचे प्रश्न चिट्टीद्वारे संकलित करण्यात येऊन लहान मुला द्वारे प्राप्तचिट्ट्यामधून चिठ्ठी उचलून समस्या वाचन करण्यात आल्या.यामुळे योजनेचे साध्य होऊन महिला व ग्रामपंचायत यातील विविध समज गैरसमज योजनांचे अपुरी माहिती इत्यादी बाबत प्रकाश टाकण्यात आला. व उपस्थित महिलांना त्यांच्या भाषेत समजेल अशा पद्धतीत विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना बोलते करून ग्रामपंचायत व महिला मंडळ यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी अभिनव उपक्रम घेण्यात आला.
तसेच महिला बचत गट यांच्याकडून खाद्यप्रेमी साठी विविध स्टॉलच्या आयोजन करण्यात आले. बचत गट उपक्रमाचा स्टॉल द्वारे माहिती व प्रबोधन करण्यात आले यावेळी महिला मेळाव्यात ॲनिमिया विषयी मार्गदर्शन करण्यात येऊन ॲनिमिया निर्मूलन साठी प्रयत्न करण्याचे ठरले विविध प्रात्यक्षिकाद्वारे महिलांना ॲनिमिया चाचणी द्वारे कसा ओळखणे याबाबतचे सखोल मार्गदर्शन डॉक्टर कु. जाधव यांनी केले.
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गोरे साहेब उपस्थित होते.त्याचबरोबर उपसरपंच इंगळे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य साठे,शोभा मॅडम,निरेशा जाधव मॅडम,वाघमेंबर, सुदाम वाघ,कांबळे मेंबर, सीआरपी प्रवर्तक माळवदे मॅडम, व सर्व महिला मंडळ उपस्थित होते.








