तिरवंडी कॅनल पट्टी ते निरानदी बंधारा या रस्त्यावरील साईडपट्टी गेली चोरीला.


तिरवंडी कॅनल पट्टी ते निरानदी बंधारा या रस्त्यावरील साईडपट्टी गेली चोरीला.

(माळशिरस प्रतिनिधी) रणजीतदादा गायकवाड.

अनेक दिवसाच्या मागनीनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकलुज ने कसाबसा मंजूर केलेल्या व संबंधित ठेकेदाराने अधीकार्यांना हाताशी धरून उरकून घेतलेल्या तिरवंडी -चाकोरे रोडवरील कॅनल पट्टी ते निरानदी बंधारा या रस्त्यावरील साईडपट्टी चोरीला गेली आहे.आशी कुजबुज परीसरात सुरूआहे. या रस्त्यावरील साईडपट्टी न करता सा.बा.विभाग अकलुज चे अधीकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून पुर्ण साईडपट्टी चोरली आहे.

रस्त्याचे काम पण सुमार दर्जाचे मटेरियल वापरून उरकून घेतलेले आहे.त्यातच रस्ता लहान असल्याने व डांबरीकरणाच्या अगदी शेजारीच काटेरी झाडे-झूडपे असल्याने त्याचा रहदारीला त्रास होतो आहे.छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत.या रस्त्यावर दिवस रात्र रहदारी असते.

सध्या उस वाहतूक सुरू आहे. या मुळे रहिवास्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळेतील विध्यार्थी विद्यार्थीनीना तर जिव मुठीत घेऊन कसरत करावी लागते आहे.  छोट मोठे अपघात तर रोजचेच झाले आहेत एखादा मोठा अपघात होऊन जिवितहानी झाली तर याला जबाबदार कोण हाही प्रश्न आहे. रस्तयाचे काम पुर्ण होऊन सहा महिने पण झाले नाहीत तरीही ठिकठिकाणी रस्ता उखडायला सुरवात झालेली आहे.या रस्त्यावरील कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी व त्याला मदत करणार्या संबंधीत आधिकारी कर्मचारी यांचे निलंबन करून सदरचा रस्त्यावर चोरीला गेलेली साईडपट्टी शोधुन द्यावी. अन्यथा ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकलुज या कार्यालयसमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.कामात हायगय करणाराची तक्रार केली आसता त्याची चौकशी न करता ठेकेदाराने दिलेली चिरीमिरी घेऊन तोंडात बोळा घालून बसणार्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकलुज च्या सर्वच कार्यक्षेत्रातील कामाची गुणवत्ता तपासणी झाली पाहिजे आशीही मागणी जोर धरत आहे. …. ..


45
कृपया वोट करा

स्वराज्य हेरच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!